एकलव्य - अज्ञात वास्तव
गुरुभक्तीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून एकलव्य सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचसोबत द्रोणाचार्यांची क्रूरता आणि " वर्णाश्रम" पद्धतीच्या अन्यायाचे उदाहरण म्हणून एकलव्याचे नाव तर सगळ्यात आधी येते. पण एकलव्याच्या संपूर्ण आयुष्याबद्दल जाणून घेण्याची गरज एकाही धर्मविरोधकाला का वाटली नाही ?
महाभारतामध्ये एकलव्याची संक्षिप्त कथा आली आहेच. पण हरिवंश पुराणामध्ये त्याचे सविस्तर वर्णन आहे असे समजते. एकलव्य कोण होता,त्याची जन्मकथा, त्याच्या कुळाची कुठल्या राजवंशासोबत संधी होती, त्याचे द्रोणाचार्यांसोबतचे संबंध, अंगठा कापून दिल्यानंतर त्याने काय केले,त्याचा मृत्यू कसा झाला या सगळ्याचे वर्णन त्यात आले आहे असे वाचले.
कृष्णाचा पिता वसुदेव यादव कुळातल्या वृष्णी वंशाचा राजकुमार होता. त्याची एक बहीण होती पृथा, जिला कुंतिभोजला दत्तक दिले आणि पृथाचे नाव झाले कुंती. वसुदेवाला अजून एक भाऊ होता वृद्धश्रवा. या वृद्धश्रवाचा मुलगा होता "एकलव्य".
काही संस्करणानुसार लहानपणी जंगलात फिरत असता एकलव्य हरवला आणि निषादराज "हिरण्यधनु" याला तो सापडला. त्याने त्याला आपला मुलगा मानून त्याचे पालन पोषण केले आणि त्याला युवराज म्हणून देखील घोषित केले.
अन्य संस्करणानुसार एकलव्याचा जन्म झाला तेव्हा ज्योतिषांनी हा मुलगा यादवकुळासाठी घातक ठरेल असे भाकीत करून त्याचा त्याग करण्यास सांगितले. म्हणून एकलव्याला जंगलात सोडून दिले आणि मग तो निषाद राजाला सापडला आणि त्याने त्याला आपला पुत्र मानला अशी कथा येते.
दोन्ही संस्करणांमध्ये फरक असला तरी मूळ मुद्दा हा आहे कि एकलव्य हा नुसता एक साधासुधा आदिवासी नव्हता तर "निषाद राजा" चा पुत्र होता आणि युवराज म्हणून घोषित होता.
वर्णाश्रमावर टीका करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे कि रामायणात सुद्धा निषाद कुळाचा उल्लेख आलेला आहे. निषाद म्हणजे जंगलाजवळच्या प्रदेशी राहणारे. पण म्हणून काही ते अन्य नागरी वसाहतींपासून तुटलेले किंवा त्यागलेले नव्हते. आर्यावर्ताच्या राजकीय पटावर त्यांचे स्थान अन्य राज्यांसारखेच होते. आणि निषाद राजा आणि राम हे एकाच गुरुकुलात शिकलेले होते असे वर्णन आहे. म्हणजेच निषाद किंवा क्षुद्र कुळाला शिक्षण वर्ज्य नव्हते. महाभारतामध्येच पुन्हा "नल दमयंती" आख्यान आलेले आहे ज्यात "नल " हा मोठा निषाद राजा होता आणि तो अस्त्र शस्त्र विद्येत पारंगत होता. म्हणजेच त्यांना क्षत्रियोचित शस्त्रविद्या शिकवल्या जात होती हे प्रमाणित होते.
असे असतांना द्रोणाचार्यांनी केवळ "क्षत्रिय" नाही म्हणून एकलव्याला शिकवण्यास नकार दिला असे जे शतकानुशतकं बिंबवल्या गेले आहे ते चुकीचे वाटते. मग द्रोणाचार्यांनी असे का करावे ?
एक लक्षात घ्यायला हवे कि महाभारतात प्रत्येक कृतीमागे, घटनेमागे फार मोठे राजकारण लपलेले आहे. तिथे प्रत्येक जण एकतर एकमेकांचे हितसंबंध जोपासताना दिसतात नाहीतर प्रतिशोधासाठी किंवा अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी कुणासमोर उभे ठाकलेले दिसतात.
द्रोणाचार्यांना कुरुकुलाच्या राजकुमारांना शिक्षण देण्यासाठी भीष्मांनी नियुक्त केले होते. स्वाभाविकपणे द्रोणाचार्यांना कुरुकुलाच्या आणि तत्कालीन आर्यावर्ताच्या राजकारणाचे भान ठेवणे, कुरुकुलाचे मित्रराज्य आणि शत्रूराज्य आणि त्यांच्यातल्या घडामोडींचे आकलन करून संभाव्य धोक्यांची जाणीव ठेवणे क्रमप्राप्त होते.
एकलव्याला ज्या "हिरण्यधनु " राजाने पुत्र मानले होते, त्या निषादकुलाचे अनेक पिढ्यांपासून जरासंधासोबत हितसंबंध होते. आणि जरासंध कुरुकुलापेक्षा जास्त बलाढ्य होता. जरासंध आणि शिशुपाल यांचे सख्य आणि त्या दोघांचे यादव कुळासोबतचे वैर हे सुद्धा सगळ्यांनाच ठाऊक होते.
एकलव्याला धनुर्विद्या शिकवणे द्रोणाचार्यांना शक्य नव्हते कारण त्यांची नियुक्ती हि फक्त कुरुकुलातल्या राजकुमारांना शिकवण्यासाठीच झालेली होती.याच कारणासाठी त्यांनी कर्णाला सुद्धा शिकवण्यास नकार दिला. त्यात वर्णाचा काहीच संबंध नाही. द्रोणाचार्यांचे स्वतःचे गुरुकुल नव्हते. तसे असते तर मग त्यांना कुणाला शिष्य म्हणून स्वीकारावे आणि कुणाला नाकारावे याचे स्वात्रंत्र्य असते. अशी बंधने पडली नसती. आजकाल जसे "exclusive rights" असतात तसेच द्रोणाचार्यांच्या बाबतीत होते. असे असता ते दुसऱ्या कुणाला कसे काय शिकवणार ?
एकलव्याने फक्त गुरुचे ध्यान करून धनुर्विद्या आत्मसात केली, नव्हे त्यात तो निष्णात बनला हे सर्वस्वी त्याच्यातल्या अद्वितीय क्षमतांचा परिणाम आहे. त्याच्या या असामान्य कर्तृत्वाशी द्रोणाचार्यांचे काहीच देणेघेणे नाही, त्यात त्यांचे काडीचेही श्रेय नाहीच आहे. तसे पाहता द्रोणाचार्यांना त्याच्याकडून दक्षिण घेण्याचा काही एक अधिकार नव्हता. पण हि एकलव्याची गुरुभक्तीच आहे कि त्याने द्रोणाचार्यांना गुरुस्थानी मानले आणि त्यांना दक्षिणा देण्यासही तो आनंदाने तयार झाला.
द्रोणाचार्यांनी आपल्या गुरुपदाचा असा गैरवापर का करावा ? शिकवले नसतांना सुद्धा फक्त कुणी आपल्याला गुरु मानले म्हणून दक्षिणा का मागावी ? आणि तीसुद्धा अशी ? अंगठा मागण्याची दक्षिणा? किती क्रूरता आहे हि !
काहींच्या मते अर्जुनाने द्रोणाचार्यांकडून वचन घेतले होते कि ते फक्त त्यालाच जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवतील. म्हणून द्रोणाचार्यांनी असे केले. पण हे पटत नाही. द्रोणाचार्य अर्जुनाला धनुर्विद्येचे त्यांच्याकडे असलेले सर्व शिक्षण देऊन त्याला उत्कृष्ट धनुर्धर तर करू शकत होते. पण जगातल्या बाकी धनुर्धरांना उत्कृष्टता मिळवण्यापासून ते कसे काय अडवू शकणार होते ? ते असे थोडीच म्हणू शकत होते कि अर्जुनाशिवाय बाकी कुणी धनुर्विद्या शिकू नका म्हणून ?
एकलव्याचा अंगठा मागण्यामागे द्रोणाचार्यांची राजकारणातली दूरदृष्टी दिसून पडते. एकलव्याचे कुल हे कुरुकुलापेक्षा बलाढ्य असलेल्या कुलासोबत संधान ठेवून होते. जे भविष्यात कुरुकुलासाठी धोकादायक ठरले असते. एकलव्यासारखा महान धनुर्धारी जर कुरुकुळाविरुद्ध उभा ठाकला तर जिंकणे दुष्कर होते. द्रोणाचार्यांना जर क्रूरपणा करायचाच असता तर त्यांनी सरळ सरळ एकलव्याला आपला जीव दे असे म्हंटले असते. पण तसे केले असते तर निषादराज त्यांच्यावर चाल करून आला नसता का ? म्हणून जीव न घेता त्यांनी त्याला त्याचा अंगठाच मागितला. ते पाहता समोर उभ्या असलेल्या सगळ्या कुरुकुलातल्या राजकुमारांना ही खात्री पटली कि द्रोणाचार्यांनी कुरुकुलाप्रती किती निष्ठा आहे.अंगठ्याशिवाय कुणी बाण मारू शकणार नाही, आता एकलव्य धनुर्धारी म्हणून मेल्यातच जमा होता. कौरव पांडव वापस जायला निघाले. द्रोणाचार्यांनी एकलव्याला त्याच्या असामान्य गुरुभक्तीसाठी तो जगात प्रसिद्ध होईल असा आशीर्वाद दिला. आपल्यातल्या बहुतेकांना इथपर्यंतच गोष्ट ठाऊक आहे.
पण.. " कहानी अभी बाकी है मेरे दोस्त "
एका डोळ्यात गुरुदक्षिणा देण्याची कृतकृत्यता आणि दुसऱ्या डोळ्यात आपल्या स्वप्नभंगाचे दुःख घेऊन एकलव्य पाठमोऱ्या द्रोणाचार्यांकडे पाहत उभा होता. वापस जाणाऱ्या द्रोणाचार्यांच्या मनात विचारांचे वादळ उफाळून आले होते. एका श्रेष्ठ धनुर्धारीचे भविष्य आपण मारून टाकले याची टोचणी तर होतीच शिवाय असे करण्यास भाग पाडणाऱ्या दास्यत्वाचा रागही खदखदत होता. काय करावे जेणेकरून "गुरु" म्हणून आपण आपल्या शिष्याचे भवितव्य सुरक्षित करू शकू ? विचार करता करता त्यांना एक युक्ती सुचली. त्याच भरात ते माग वळले.
आणि त्यांनी एकलव्याला आपल्या उजव्या हाताची तर्जनी आणि मध्यमा दाखवून खूण केली. कुशाग्र एकलव्याला ती कळली. आणि त्याने हि दोन बोटे वापरून बाण चालवण्याचा सराव सुरु केला. मनोमन द्रोणाचार्यांनी एकलव्याला आशीर्वाद दिला कि पुढच्या पिढीतले धनुर्धर अंगठा न वापरता अश्याच पद्धतीने बाण चालवतील. आणि आजही अश्याच पद्धतीने बाण चालवतात.
पुन्हा चिकाटीने अभ्यास करून एकलव्य श्रेष्ठ धनुर्धर झाला. निषादराजाच्या मृत्यूनंतर राजा झालेल्या एकलव्याने कुलपरंपरेनुसार जरासंधासोबत सख्य केले. पुढे काय झाले ?
काहींच्या मते रुख्मिणी हरणाच्या वेळी एकलव्य शिशुपालाच्या बाजूने कृष्णाविरुद्ध लढला. या युद्धात कृष्णाने एका दगडाच्या सहाय्याने त्याचा वध केला.
तर काहींच्या मते जरासंध आणि शिशुपाल जेव्हा मथुरेवर आक्रमण करत तेव्हा एकलव्य जरासंधाचा सेनापती बनून लढत होता. एकदा त्याने आपल्या पराक्रमाने सर्व यादवसैन्याची धूळधाण उडवली. तेव्हा कृष्णाने एकलव्याचा वध केला.
आता इथे पुन्हा प्रश्न पडतो कि जरी असे मानले कि एकलव्याला आपली जन्मकथा ठाऊक नव्हती म्हणून त्याने यादव कुलाविरुद्ध युद्ध पुकारले तरीसुद्धा कृष्ण तर सर्वज्ञ होता ना ? त्याने एकलव्याला का मारले ? तो तर त्याचा चुलत भाऊच होता, नाही का ?
कारण एकच. धर्माचे रक्षण ! अधर्माचा नाश ! एकलव्याने प्रत्यक्ष त्याचे काही शत्रुत्व नसतांना मथुरेविरुद्ध युद्ध केले. अधर्माची कास धरली. आणि या एकाच कारणापायी कर्णाप्रमाणेच एकलव्याची गत झाली. एक श्रेष्ठ धनुर्धारी गतप्राण झाला.
पण तो पुन्हा आला.
द्रोणाचार्यांचा वध करून प्रतिशोध घेणारा वीर योद्धा बनून ! धृष्टद्युम्न !
- पूर्णिमा देशमुख पुरेकर
गुरुभक्तीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून एकलव्य सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचसोबत द्रोणाचार्यांची क्रूरता आणि " वर्णाश्रम" पद्धतीच्या अन्यायाचे उदाहरण म्हणून एकलव्याचे नाव तर सगळ्यात आधी येते. पण एकलव्याच्या संपूर्ण आयुष्याबद्दल जाणून घेण्याची गरज एकाही धर्मविरोधकाला का वाटली नाही ?
महाभारतामध्ये एकलव्याची संक्षिप्त कथा आली आहेच. पण हरिवंश पुराणामध्ये त्याचे सविस्तर वर्णन आहे असे समजते. एकलव्य कोण होता,त्याची जन्मकथा, त्याच्या कुळाची कुठल्या राजवंशासोबत संधी होती, त्याचे द्रोणाचार्यांसोबतचे संबंध, अंगठा कापून दिल्यानंतर त्याने काय केले,त्याचा मृत्यू कसा झाला या सगळ्याचे वर्णन त्यात आले आहे असे वाचले.
कृष्णाचा पिता वसुदेव यादव कुळातल्या वृष्णी वंशाचा राजकुमार होता. त्याची एक बहीण होती पृथा, जिला कुंतिभोजला दत्तक दिले आणि पृथाचे नाव झाले कुंती. वसुदेवाला अजून एक भाऊ होता वृद्धश्रवा. या वृद्धश्रवाचा मुलगा होता "एकलव्य".
काही संस्करणानुसार लहानपणी जंगलात फिरत असता एकलव्य हरवला आणि निषादराज "हिरण्यधनु" याला तो सापडला. त्याने त्याला आपला मुलगा मानून त्याचे पालन पोषण केले आणि त्याला युवराज म्हणून देखील घोषित केले.
अन्य संस्करणानुसार एकलव्याचा जन्म झाला तेव्हा ज्योतिषांनी हा मुलगा यादवकुळासाठी घातक ठरेल असे भाकीत करून त्याचा त्याग करण्यास सांगितले. म्हणून एकलव्याला जंगलात सोडून दिले आणि मग तो निषाद राजाला सापडला आणि त्याने त्याला आपला पुत्र मानला अशी कथा येते.
दोन्ही संस्करणांमध्ये फरक असला तरी मूळ मुद्दा हा आहे कि एकलव्य हा नुसता एक साधासुधा आदिवासी नव्हता तर "निषाद राजा" चा पुत्र होता आणि युवराज म्हणून घोषित होता.
वर्णाश्रमावर टीका करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे कि रामायणात सुद्धा निषाद कुळाचा उल्लेख आलेला आहे. निषाद म्हणजे जंगलाजवळच्या प्रदेशी राहणारे. पण म्हणून काही ते अन्य नागरी वसाहतींपासून तुटलेले किंवा त्यागलेले नव्हते. आर्यावर्ताच्या राजकीय पटावर त्यांचे स्थान अन्य राज्यांसारखेच होते. आणि निषाद राजा आणि राम हे एकाच गुरुकुलात शिकलेले होते असे वर्णन आहे. म्हणजेच निषाद किंवा क्षुद्र कुळाला शिक्षण वर्ज्य नव्हते. महाभारतामध्येच पुन्हा "नल दमयंती" आख्यान आलेले आहे ज्यात "नल " हा मोठा निषाद राजा होता आणि तो अस्त्र शस्त्र विद्येत पारंगत होता. म्हणजेच त्यांना क्षत्रियोचित शस्त्रविद्या शिकवल्या जात होती हे प्रमाणित होते.
असे असतांना द्रोणाचार्यांनी केवळ "क्षत्रिय" नाही म्हणून एकलव्याला शिकवण्यास नकार दिला असे जे शतकानुशतकं बिंबवल्या गेले आहे ते चुकीचे वाटते. मग द्रोणाचार्यांनी असे का करावे ?
एक लक्षात घ्यायला हवे कि महाभारतात प्रत्येक कृतीमागे, घटनेमागे फार मोठे राजकारण लपलेले आहे. तिथे प्रत्येक जण एकतर एकमेकांचे हितसंबंध जोपासताना दिसतात नाहीतर प्रतिशोधासाठी किंवा अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी कुणासमोर उभे ठाकलेले दिसतात.
द्रोणाचार्यांना कुरुकुलाच्या राजकुमारांना शिक्षण देण्यासाठी भीष्मांनी नियुक्त केले होते. स्वाभाविकपणे द्रोणाचार्यांना कुरुकुलाच्या आणि तत्कालीन आर्यावर्ताच्या राजकारणाचे भान ठेवणे, कुरुकुलाचे मित्रराज्य आणि शत्रूराज्य आणि त्यांच्यातल्या घडामोडींचे आकलन करून संभाव्य धोक्यांची जाणीव ठेवणे क्रमप्राप्त होते.
एकलव्याला ज्या "हिरण्यधनु " राजाने पुत्र मानले होते, त्या निषादकुलाचे अनेक पिढ्यांपासून जरासंधासोबत हितसंबंध होते. आणि जरासंध कुरुकुलापेक्षा जास्त बलाढ्य होता. जरासंध आणि शिशुपाल यांचे सख्य आणि त्या दोघांचे यादव कुळासोबतचे वैर हे सुद्धा सगळ्यांनाच ठाऊक होते.
एकलव्याला धनुर्विद्या शिकवणे द्रोणाचार्यांना शक्य नव्हते कारण त्यांची नियुक्ती हि फक्त कुरुकुलातल्या राजकुमारांना शिकवण्यासाठीच झालेली होती.याच कारणासाठी त्यांनी कर्णाला सुद्धा शिकवण्यास नकार दिला. त्यात वर्णाचा काहीच संबंध नाही. द्रोणाचार्यांचे स्वतःचे गुरुकुल नव्हते. तसे असते तर मग त्यांना कुणाला शिष्य म्हणून स्वीकारावे आणि कुणाला नाकारावे याचे स्वात्रंत्र्य असते. अशी बंधने पडली नसती. आजकाल जसे "exclusive rights" असतात तसेच द्रोणाचार्यांच्या बाबतीत होते. असे असता ते दुसऱ्या कुणाला कसे काय शिकवणार ?
एकलव्याने फक्त गुरुचे ध्यान करून धनुर्विद्या आत्मसात केली, नव्हे त्यात तो निष्णात बनला हे सर्वस्वी त्याच्यातल्या अद्वितीय क्षमतांचा परिणाम आहे. त्याच्या या असामान्य कर्तृत्वाशी द्रोणाचार्यांचे काहीच देणेघेणे नाही, त्यात त्यांचे काडीचेही श्रेय नाहीच आहे. तसे पाहता द्रोणाचार्यांना त्याच्याकडून दक्षिण घेण्याचा काही एक अधिकार नव्हता. पण हि एकलव्याची गुरुभक्तीच आहे कि त्याने द्रोणाचार्यांना गुरुस्थानी मानले आणि त्यांना दक्षिणा देण्यासही तो आनंदाने तयार झाला.
द्रोणाचार्यांनी आपल्या गुरुपदाचा असा गैरवापर का करावा ? शिकवले नसतांना सुद्धा फक्त कुणी आपल्याला गुरु मानले म्हणून दक्षिणा का मागावी ? आणि तीसुद्धा अशी ? अंगठा मागण्याची दक्षिणा? किती क्रूरता आहे हि !
काहींच्या मते अर्जुनाने द्रोणाचार्यांकडून वचन घेतले होते कि ते फक्त त्यालाच जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवतील. म्हणून द्रोणाचार्यांनी असे केले. पण हे पटत नाही. द्रोणाचार्य अर्जुनाला धनुर्विद्येचे त्यांच्याकडे असलेले सर्व शिक्षण देऊन त्याला उत्कृष्ट धनुर्धर तर करू शकत होते. पण जगातल्या बाकी धनुर्धरांना उत्कृष्टता मिळवण्यापासून ते कसे काय अडवू शकणार होते ? ते असे थोडीच म्हणू शकत होते कि अर्जुनाशिवाय बाकी कुणी धनुर्विद्या शिकू नका म्हणून ?
एकलव्याचा अंगठा मागण्यामागे द्रोणाचार्यांची राजकारणातली दूरदृष्टी दिसून पडते. एकलव्याचे कुल हे कुरुकुलापेक्षा बलाढ्य असलेल्या कुलासोबत संधान ठेवून होते. जे भविष्यात कुरुकुलासाठी धोकादायक ठरले असते. एकलव्यासारखा महान धनुर्धारी जर कुरुकुळाविरुद्ध उभा ठाकला तर जिंकणे दुष्कर होते. द्रोणाचार्यांना जर क्रूरपणा करायचाच असता तर त्यांनी सरळ सरळ एकलव्याला आपला जीव दे असे म्हंटले असते. पण तसे केले असते तर निषादराज त्यांच्यावर चाल करून आला नसता का ? म्हणून जीव न घेता त्यांनी त्याला त्याचा अंगठाच मागितला. ते पाहता समोर उभ्या असलेल्या सगळ्या कुरुकुलातल्या राजकुमारांना ही खात्री पटली कि द्रोणाचार्यांनी कुरुकुलाप्रती किती निष्ठा आहे.अंगठ्याशिवाय कुणी बाण मारू शकणार नाही, आता एकलव्य धनुर्धारी म्हणून मेल्यातच जमा होता. कौरव पांडव वापस जायला निघाले. द्रोणाचार्यांनी एकलव्याला त्याच्या असामान्य गुरुभक्तीसाठी तो जगात प्रसिद्ध होईल असा आशीर्वाद दिला. आपल्यातल्या बहुतेकांना इथपर्यंतच गोष्ट ठाऊक आहे.
पण.. " कहानी अभी बाकी है मेरे दोस्त "
एका डोळ्यात गुरुदक्षिणा देण्याची कृतकृत्यता आणि दुसऱ्या डोळ्यात आपल्या स्वप्नभंगाचे दुःख घेऊन एकलव्य पाठमोऱ्या द्रोणाचार्यांकडे पाहत उभा होता. वापस जाणाऱ्या द्रोणाचार्यांच्या मनात विचारांचे वादळ उफाळून आले होते. एका श्रेष्ठ धनुर्धारीचे भविष्य आपण मारून टाकले याची टोचणी तर होतीच शिवाय असे करण्यास भाग पाडणाऱ्या दास्यत्वाचा रागही खदखदत होता. काय करावे जेणेकरून "गुरु" म्हणून आपण आपल्या शिष्याचे भवितव्य सुरक्षित करू शकू ? विचार करता करता त्यांना एक युक्ती सुचली. त्याच भरात ते माग वळले.
आणि त्यांनी एकलव्याला आपल्या उजव्या हाताची तर्जनी आणि मध्यमा दाखवून खूण केली. कुशाग्र एकलव्याला ती कळली. आणि त्याने हि दोन बोटे वापरून बाण चालवण्याचा सराव सुरु केला. मनोमन द्रोणाचार्यांनी एकलव्याला आशीर्वाद दिला कि पुढच्या पिढीतले धनुर्धर अंगठा न वापरता अश्याच पद्धतीने बाण चालवतील. आणि आजही अश्याच पद्धतीने बाण चालवतात.
पुन्हा चिकाटीने अभ्यास करून एकलव्य श्रेष्ठ धनुर्धर झाला. निषादराजाच्या मृत्यूनंतर राजा झालेल्या एकलव्याने कुलपरंपरेनुसार जरासंधासोबत सख्य केले. पुढे काय झाले ?
काहींच्या मते रुख्मिणी हरणाच्या वेळी एकलव्य शिशुपालाच्या बाजूने कृष्णाविरुद्ध लढला. या युद्धात कृष्णाने एका दगडाच्या सहाय्याने त्याचा वध केला.
तर काहींच्या मते जरासंध आणि शिशुपाल जेव्हा मथुरेवर आक्रमण करत तेव्हा एकलव्य जरासंधाचा सेनापती बनून लढत होता. एकदा त्याने आपल्या पराक्रमाने सर्व यादवसैन्याची धूळधाण उडवली. तेव्हा कृष्णाने एकलव्याचा वध केला.
आता इथे पुन्हा प्रश्न पडतो कि जरी असे मानले कि एकलव्याला आपली जन्मकथा ठाऊक नव्हती म्हणून त्याने यादव कुलाविरुद्ध युद्ध पुकारले तरीसुद्धा कृष्ण तर सर्वज्ञ होता ना ? त्याने एकलव्याला का मारले ? तो तर त्याचा चुलत भाऊच होता, नाही का ?
कारण एकच. धर्माचे रक्षण ! अधर्माचा नाश ! एकलव्याने प्रत्यक्ष त्याचे काही शत्रुत्व नसतांना मथुरेविरुद्ध युद्ध केले. अधर्माची कास धरली. आणि या एकाच कारणापायी कर्णाप्रमाणेच एकलव्याची गत झाली. एक श्रेष्ठ धनुर्धारी गतप्राण झाला.
पण तो पुन्हा आला.
द्रोणाचार्यांचा वध करून प्रतिशोध घेणारा वीर योद्धा बनून ! धृष्टद्युम्न !
- पूर्णिमा देशमुख पुरेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा